Skip to main content

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.............


स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 1.....
स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लासेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या....
आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.....
१. निकालामागचे गौडबंगाल....... याच पेज वरची माझी ६ मे ची पोस्ट बघावी..
२. शिक्षक.....
क्लास का लावायचा असतो? शिकण्यासाठी.... शिकवते कोण? शिक्षक... त्यामुळे क्लास लावायचा असेल तर सगळ्यात मह्त्वाची कोणती बाब बघावी? शिक्षक कोण आहेत....
सामान्यतः क्लासेस मध्ये तुम्हाला खालील भूमिका पार पडणाऱ्या व्यक्ती भेटलीत...
अ. संचालक / क्लासप्रमुख- विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणे, अभ्यासक्रमावर लक्ष ठेवणे, नियोजनात मदत करणे इ. याचबरोबर क्लास वा संस्थेच्या व्यावसायिक आणि प्रशासकीय बाजू बघणे
ब. समुपदेशक- क्लासला भेट देणाऱ्यांना क्लास व बॅचेस ची माहिती देणे
क. स्पर्धा परीक्षा प्रचारक- कार्यशाळा वा जाहीर व्याख्याने घेऊन नागरी सेवा हे करिअर कसे चांगले आहे याचा प्रसार करणे (अर्थात क्लासचा प्रचार करणे )
ड. लेखक- स्पर्धा परीक्षेशी संबंधीत लेखन करणे
इ. शिकवणे
शिक्षकांनी वरील पहिल्या चार भूमिका पार पाडायला काहीच हरकत नाही, ते महत्त्वाचे कार्य आहे पण त्यांचे प्रमुख काम ‘शिकवणे’ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. बरेचसे विद्यार्थी – पालक पहिल्या चार भूमिका पार पाडणाऱ्यांना शिक्षक समजतात आणि फसतात.
क्लासमध्ये तुम्हाला नक्की कोण शिकवणार आहे हे विचारा. बऱ्याच वेळेला ज्या व्यक्तीसाठी आपण क्लास लावतो, ती व्यक्ती शिकवतच नसते. शिकवत असेल तर उत्तम पण खात्री करून घ्या --- ती व्यक्ती किती लेक्चर घेणार? कोणते विषय शिकवणार?
काही क्लासप्रमुख केवळ स्फुर्ती देणे, नियोजन करून देणे, मानसिक आधार देणे याच गोष्टी करतात. त्याची गरज असतेच, पण तुम्ही विचार करा तुम्ही फक्त त्यासाठीच क्लास लावत आहात का?
खरेतर शिक्षकासाठी कोणता अनुभव असावा हा अवघड प्रश्न आहे. शिक्षकांकडे UPSC वा MPSC च्या परीक्षांचा अनुभव पाठीशी असणे गरजेचे आहे, कमीत कमी मुख्य परीक्षा तरी त्यांनी दिलेली असावी. एकही पूर्व परीक्षा पास न होणारा शिक्षक तुम्हाला चालेल का?
काही शिक्षक एकाच वेळेस बऱ्याच ठिकाणी शिकवतात. तसे असेल तर विद्यार्थ्याकडे ते व्यक्तिगत लक्ष देऊ शकत नाहीत.
काही ठिकाणी एकच व्यक्ती सामान्य अध्ययनाचे सगळेच विषय शिकवतात किंवा एकापेक्षा जास्त वैकल्पिक विषय शिकवतात. खरे तर हे हास्यास्पद आहे.
काही वेळेला तो शिक्षक त्या विषयात निपुण नसतो. स्वतः त्या विषयाचा पहिल्यांदा अभ्यास करत करत शिकवणारे शिक्षक सुद्धा असतात.
वर्षभर त्याच शिक्षकांनी शिकवणे अपेक्षित आहे. मधेच शिक्षक बदलले तर त्याचा तुमच्या अभ्यासावर वाईट परिणाम होऊ शकतो.
काहीवेळेला “मागील यशस्वी अधिकारी शिकवणार” अशी आकर्षक जाहिरात केली जाते. पूर्वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जरूर करावे पण ते संपूर्ण बॅच घेणार आहेत का याची खात्री करावी कारण त्यांच्याकडे वर्षभर बॅच घेण्यासाठी वेळ नसतो.
शिक्षक तुम्हाला गरज असेल तेव्हा उपलब्ध असणार आहेत का याची खात्री करून घ्या.

“””””क्लास लावण्यापूर्वी "खरा शिक्षक' कोण आहे? हे जाणून घ्या. . तुम्हाला जे शिक्षक प्रत्यक्ष शिकवणार आहेत त्यांना भेटा आणि तुमची खात्री करून घ्या.””””” 


स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......प्रकरण 2.....
स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लास्सेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या....
आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.....
१. निकालामागचे गौडबंगाल.......याच पेज वरची माझी ६ मे ची पोस्ट बघावी..
“”””जर तुम्हाला पूर्व वा मुख्य परीक्षेसाठी क्लास लावायचा असेल तर त्या क्लासने दावा केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यानि तीच बॉच केली असेल असे नाही. तुम्हाला ज्या विषयासाठी क्लास लावायचा असेल त्या विषयाचा त्या क्लासचा निकाल कसा आहे हे पडताळून पाहणे गरजेचे आहे. “”””
२. शिक्षक.....याच पेज वरची माझी 13 मे ची पोस्ट बघावी..
“””””क्लास लावण्यापूर्वी तुम्हाला जे शिक्षक प्रत्यक्ष शिकवणार आहेत त्यांना भेटा आणि तुमची खात्री करून घ्या.”””””
३. नोट्स....
क्लासमध्ये सर्व विषयाच्या इत्थंभूत छापील नोट्स मिळणे आवश्यक आहे. केवळ नोट्समुळे कोणी पास होत नाही परंतु क्लासने नोट्स दिल्या तर तुमचा लिखाणाचा बराच वेळ वाचतो. संदर्भ पुस्तके वाचून क्लास नोट्स मध्ये नसलेली माहिती तुम्ही नोट्स मधेच अॅड करणे अपेक्षित आहे. सगळ्याच नोट्स तुम्हाला काढाव्या लागल्या तर त्यात खूप वेळ जातो. 
कमी जास्त प्रमाणात सगळेच क्लास काहीतरी नोट्स देतातच. तुम्ही त्याच्या दर्जाची खात्री करून घेणे गरजेचे आहे. सगळ्याच विषयांच्या इत्थंभूत नोट्स मिळतात कि नाही हेही तपासणे गरजेचे आहे. नोट्स सुधारित (updated) असणे अपेक्षित आहे.
क्लास जर छापील नोट्स न देता लिहून देत असेल तर क्लासचा निम्मा वेळ लिहून देण्यातच जातो. अध्यापनाचा भर चर्चा आणि विश्लेषणावर असावा न कि लिखाणावर. 
काही शिक्षक सांगतात, वर्गात लिहून दिले कि तो विषय एकदा हाताखालून जातो. यात कितीसे तथ्य आहे? परीक्षेत ज्या प्रकारचे लिखाण करावे लागते त्याप्रकारच्या लिखाणाच्या सरावासाठी स्वतंत्रपणे सराव चाचण्या असाव्यात. 
काही क्लासेस तर चक्क दुसऱ्याच क्लास च्या नोट्स वापराव्यात असा सल्ला देतात. तुम्ही एखादा क्लास लावला तरीही इतर क्लासच्या नोट्स वापरायला काहीच हरकत नाही. पण तो निर्णय तुम्ही घ्याल. स्वतः क्लास नेच सांगणे, आपल्या नोट्स च नाहीत किंवा त्या चांगल्या नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या नोट्स वापरा, हे कितपत योग्य आहे.
******क्लास लावण्यापूर्वी तुम्ही स्वतः नोट्स च्या दर्जाची खात्री करून घ्या. सर्वच विषयाच्या नोट्स मिळतात याची खात्री करा. मागील वर्षाच्या नोट्स पाहण्यासाठी मागून घ्या.******
४. टेस्ट सिरीज आणि अभिप्राय (feedback) ....
तुम्ही जर एखाद्या क्लासला विचारले ‘तुम्ही टेस्ट घेता का?’ उत्तर ‘हो’ असेच मिळणार आहे. नुसती टेस्ट सिरीज असून उपयोगाचे नाही, ती दर्जेदारच असली पाहिजे. परंतु त्यांचे नियोजन कसे असते? किती टेस्ट घेतल्या जातात? त्या वेळेवर होतात का? त्यांचा दर्जा कसा असतो? पेपर वेळेवर तपासून मिळतात का ? वैयक्तिक अभिप्राय मिळतो का ? याची शहानिशा करणे गरजेचे आहे. 
लक्षात ठेवा हि स्पर्धा परीक्षा आहे, इतरांच्या तुलनेत तुम्ही नक्की कुठे आहात हे कळण्यासाठी एका चांगल्या टेस्ट सिरीजची गरज असतेच. 
वैयक्तिक अभिप्राय मिळणे फार गरजेचे आहे. प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत , त्यातील समस्या वेगवेगळ्या असतात. शिक्षकांनी त्या वेळ काढून वैयक्तिकरित्या सोडविल्या पाहिजेत.
तुम्ही क्लास लावताना खरेतर टेस्ट सिरीज आणि अभिप्राय विषयी बाबींचा करार बॉंड पेपर वर करून घेतला पाहिजे.
क्लास ची निवड चुकली आहे हे कालांतराने जरी तुमच्या लक्षात आले तरी, तुम्ही टेस्ट सिरीज दुसरीकडे लावा. बरेच प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पर्याय आज उपलब्ध आहेत.
******माझा तुम्हाला सल्ला आहे.... क्लास लावा अगर लावू नका, चांगली टेस्ट सिरीज लावणे मात्र अनिवार्य आहे ******




स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......अंतिम प्रकरण 3.....
स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लास्सेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या....
आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.....
१. निकालामागचे गौडबंगाल.......याच पेज वरची माझी ६ मे ची पोस्ट बघावी..
२. शिक्षक.....याच पेज वरची माझी 13 मे ची पोस्ट बघावी..
३. नोट्स....याच पेज वरची माझी 17 मे ची पोस्ट बघावी..
४. टेस्ट सिरीज आणि अभिप्राय (feedback) ....याच पेज वरची माझी 17 मे ची पोस्ट बघावी..
५. वेळापत्रक.....
चांगले शिक्षक, नोट्स आणि टेस्ट सिरीज बरोबर गरज आहे योग्य वेळापत्रकाची. 
क्लास लावण्यापूर्वी त्या क्लास च्या मागील विद्यार्थ्यांकडून पुढील बाबींची शहानिशा करायला विसरू नका.... 
=संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो का?
=प्रत्येक विषयाला योग्य न्याय मिळतो का? 
=एखादया विषयाचे अध्यापन चालू केल्यानंतर त्याचा अभ्यासक्रम संपेपर्यंत तोच विषय शिकवला जातो कि मधेच सोडून दिला जातो, पुन्हा काही काळानंतर शिकवला जातो? (हे योग्य नाही) 
=लेक्चर वेळेवर होतात का? 
=संपूर्ण बॅच किती तासांची आहे? इ. इ.
तुम्ही क्रॅश कोर्स, विकेंड बॅच, दीर्घ मुदतीच्या बॅचेस लावणार असाल तर वरील मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरतील.
****क्लास लावण्यापूर्वी त्या क्लासच्या मागील वर्षीच्या त्याच बॅचचे वेळापत्रक नीट पार पडले का याची खात्री केल्याशिवाय पैसे भरू नका*****
६. फी....
फी किती आकारावी हा अर्थातच प्रत्येक क्लासचा अधिकार आहे... परंतु जी फी आकारली जाते त्याचे काहीतरी स्पष्टीकरण असले पाहिजे ... शिक्षक कोण आहेत?, किती तास शिकवले जाणार आहे?, नोट्स ची पाने किती आहेत?, टेस्ट किती आहेत?, अभिप्राय (feedback) साठी शिक्षक किती वेळ देणार आहेत? यावर फी ठरावी.. 
कर वेगेळे आकारले जातात का? नंतर काही पैसे भरावे लागतात का? फी परत (Refund) मिळण्याची काही सोय आहे का? हे आधीच विचारून घ्या.
*****फी मध्ये नक्की काय काय पुरवले जाते याची क्लास कडून यादीच घ्या.******
७. स्ट्रॅटेजी (strategy).....
वरील बाबीविषयी क्लास चे धोरण म्हणजेच क्लासची स्ट्रॅटेजी. प्रत्येक क्लास बरोबर ती बदलू शकते. ती समजावून घेऊन, ती तुम्हाला कितपत लागू पडेल याचा विचार करून क्लास लावण्याचा निर्णय घ्यावा.
८. ‘डेमो’ लेक्चर.......
तुमचा अजूनही तो क्लास लावण्याचा निर्णय निश्चित होत नसेल तर ‘डेमो’ लेक्चर ची मागणी करा. तो तुमचा हक्क आहे. त्यानंतरच फी भरा.
क्लास किती जुना आहे, त्याच्या शाखा किती आहेत, त्यांच्याकडे किती विद्यार्थी आहेत, त्याची जाहिरात किती आहे..... या पेक्षा पूर्वीच्या विद्यार्थ्यांचे त्या क्लास विषयी मत काय आहे हा प्रश्न महत्त्वाचा....
कालपरत्वे क्लास, संस्था किंवा संचालक यांच्या विशिष्ट इमेज तयार होतात. संस्था किंवा संचालक ‘प्रशासनात मराठी टक्का वाढवणे, सामाजिक क्रांती करणे, चळवळ करणे, NGO च्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे, युवकांचे व्यक्तिमत्व विकसन करणे’ अशी व्यापक ध्येये समोर ठेवतात. हे कार्य महत्त्वाचे आहे, परंतु स्पर्धा परीक्षेचा क्लास हे त्याचे माध्यम होऊच शकत नाही. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. 
तुम्ही क्लास लावत आहात, एखाद्या सामाजिक चळवळीत सहभागी होत नाही आहात, याचे भान ठेवा. या क्षणी तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अभ्यास करून पास होणे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणे. ते होत असेल तरच दुसऱ्या गोष्टीला अर्थ आहे. म्हणून क्लास निवडण्याचा तुमचा निर्णय व्यावसायिक असावा... जेणे करून तुमच्या आयुष्यातील दोन वर्ष आणि तुमच्या पालकांचे पैसे वाया जाऊ नयेत...
आज स्पर्धा परीक्षा प्रचारकांची महाराष्ट्रात कमी नाही. माझी या सगळ्यांना विनंती आहे... नुसते MPSC आणि UPSC चे करिअर किती चांगले आहे, याचा प्रचार करण्याबरोबरच वरील मुद्देही विद्यार्थ्यापर्यंत पोहचवावेत.
माझी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष विनंती आहे... महाराष्ट्रातील विद्यार्थी कुठला क्लास लावतो यात त्यांची भूमिका अतिशय निर्णायक आहे, हे ते नाकारू शकत नाहीत. त्यांनी याचा अधिक गांभीर्याने विचार करावा.
*****विद्यार्थी आणि पालकांनो, या मुद्यांचा न कंटाळता पाठपुरावा करूनच तुम्ही निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. त

Comments

Popular posts from this blog

UPSC To Implement Changes in Civil Services Exam Pattern 2018 | Here’s All You Need To Know

The Union Public Service Commission (UPSC) is in talks to bring about some major changes in the exam pattern of the Civil Services Examination conducted every year. Changes to bring about in the UPSC Civil Services Examination were being proposed from quite a while now. Lately, the UPSC had made an expert committee in order to review the exam pattern of the Civil Services Examination conducted by the UPSC back in August 2015. Baswan Committee Recommends Changes In UPSC Exam Pattern The Baswan Committee is keen on bringing about certain changes in the UPSC Civil Services Exam Pattern. The Civil Services Examination which is conducted every year in order to recruit the top level bureaucrats to work with the Indian Administration. The UPSC conducted Civil Services Exam is one of the most privileged and toughest Exams conducted in the country. The Baswan Committee has recommended changes in the UPSC Civil Services Exam. A report suggesting the various changes in the UPSC Civil Services E...

UPSC Civil Services: FAQs about the preliminary exam

The Union Public Service Commission (UPSC) conducts the prestigious civil services examination for recruiting candidates into prestigious posts in the administration including IAS, IRS, IPS, IFS etc. UPSC is an organisation that works under the government of India to recruit staff for various posts in various ministries and departments and in subordinate offices. (Read: Civil service as a career: How to crack the civil service) So as to clear any doubts regarding the exam, we have answered here a few commonly asked questions regarding the same: Q. What are the civil services? The UPSC conducts the civil services examination for recruitment to the Indian Administrative Service (IAS), Indian Foreign Service (IFS), Indian Police Service (IPS) and other central services and posts in accordance with the rules published by the Department of Personnel and Training in the gazette of India extraordinary. This preliminary examination is meant to serve as a screening test only. Q. What ...